डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांकडे शेत जमीन अल्प प्रमाणात असून, अतिवृष्टी आणि कोरडा दुष्काळ समस्या गंभीर स्वरूपाची आहे. परिणामी लहान मुले तसेच प्रौढ स्त्री पुरुषांमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणातआढळते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी पौष्टीक आहार निर्माण करणे जरुरी होते. शासनाने आदिवासी कुटुंबाच्या घराभोवती असलेल्या परस बागेत विशिष्ट भाजीपाला व फळांची लागवड करण्यास प्राधान्य दिले. परसबागेत उपयुक्त फळे व भाजीपाला पिकवून त्यांच्या रोजच्या आहारात परिपूर्ण अन्नद्रव्याचा समावेश करणे जरुरी होते.
उपल्बध परसबागेतील जागेत फळझाडे व भाजीपाला पिकाची योजना राज्यात सन २००३-०४ पासून राबविण्यात येत आहे. ही योजना राज्यातील नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, गोंदिया अशा एकूण१४ जिल्हयात सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे उद्दिष्ट
१. सन २०२९अखेर ४००० हजार आदिवासी लाभार्थ्यांच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला पिकांची लागवड करण्याचे आहे.
२. फळझाडे व भाजीपाल्याची कलमे अथवा रोपे शासकिय रोपवाटिका, कृषि विद्यापीठ रोपवाटिका अथवा नोंदणीकृत खाजगी रोपवाटीके मधून पुरविण्यात येतात.
३. तसेच फळभाज्या बियाणे कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय बिज निगम, राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडून उपलब्ध करण्यात येते.
४. शेतीकामासाठी लागणारी अवजारांमध्ये फावडे, टिकाव, कुदळ आणि एकत्रित असलेले अवजार इत्यादींचे वाटप करण्यात येते.
५. आदिवासी बांधवांकडे स्वतःची अवजारे असल्यास त्यास अवजाराऐवजी कलमे किंवा रोपे तसेच बी बियाणाचा पुरवठा एकूण रु. २५०/- तरतुदी नुसार लागवड क्षेत्राच्या आकारमानानुसारकरण्यात येतो.
आदिवासी क्षेत्रातील कुपोषणग्रस्त गांवामधील कुटुंबाकडे शेतजमीन किंवा परसबाग उपलब्ध असावी.
राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनच्या अंतरंग कुपोषीत बालके असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
याअगोदर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास पुन्हा लाभ घेता येत नाही.
आदिवासी कुटुंबामध्ये कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याने विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील सर्व आदिवासी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्यास चक्रीय पध्दतीने किमान ५ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा लाभ घेता येतो.
रोपांची लागवड, जोपासना, फळे काढणी ब भाजीपाला यांचे खाद्यपदार्थ तयार करणे इत्यादीबाबत प्रशिक्षण, ग्रामस्तरावर देण्यात येते. प्रशिक्षणासाठी होणारा खर्च आत्मा मधुन करण्याचे प्रावधान आहे.
संदर्भ:
१. शासन निर्णय क्र फलयो – २०१४/प्र.क्र.१०४/९ ए दिनांक १९/०७/२०१४
२. कृषी व पदुम विभाग शासन निर्णय आयपो – २०२० /प्र.क्र २१०/९ ए दिनांक २८/१०/२०२०
आदिवासी कुटुंबाकरिता परसबाग मार्गदर्शक सूचना
कृषि उपसंचालक
(कोरडवाहू शेती अभियान)
पत्ता: साखर संकुल, शिवाजीनगर पुणे, महाराष्ट्र ४११००५